आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा १२ कोटी जनतेला लाभ; मिळणार एकीकृत कार्ड | काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Aayush Man Bharat Card 2023 | आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व १२ कोटी जनतेला एकीकृत कार्ड | आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकात्मिक पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील सर्व १२ कोटी नागरिकांना एकत्रित कार्ड दिले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज या योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसह 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयुष्मान भारत योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री.मांडविया बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जनऔषधी केंद्रे अधिक संख्येने उघडली जातील आणि लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतील. जे बाजारात विकल्या जाणाऱ्या औषधांच्या निम्म्या किमतीत उपलब्ध असेल. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधेसह ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट सुरू केले जाईल. असे आरोग्य मंत्री श्री मांडविया यांनी सांगितले.
Aayush Man Bharat : आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा १२ कोटी जनतेला लाभ; मिळणार एकीकृत कार्ड | काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी राज्यातील दोन्ही योजनांसाठी एकच कार्ड बनविण्याची सूचना करताना सांगितले की, केंद्र आणि राज्याच्या योजना समन्वयाने राबविल्यास केंद्र सरकारला 60 टक्के रक्कम मिळते. यासाठी भारत सरकार आयुष्मान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसे खर्च झाले, याचा संदेश दिला जाईल. यासोबतच रुग्णालयांना लवकरच पैसे मिळतील. लाभार्थी स्वतःचे कार्ड वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतो. त्यांना गावातच कार्ड मिळेल. गावातील कार्डधारकांची यादी ग्रामसभेकडे असेल.
या योजनेत सर्व सार्वजनिक रुग्णालयांचा समावेश करण्यात यावा, असेही ते पुढे म्हणाले. यामध्ये रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता दिला जाऊ शकतो. यासोबतच आशा वर्कर्सना त्यांच्या स्मार्ट मोबाईलवरून कार्ड बनवण्यासाठी प्रति कार्ड ५ रुपये मिळणार आहेत. गावातील लाभार्थ्यांची यादी गावातील आशा अधिकाऱ्याकडे पाठवावी. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालये बळकट झाली आहेत. देशात मोठ्या प्रमाणात रुग्णालये जोडली जात आहेत. प्रत्येक सहभागी हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात खर्च न झालेला निधी राज्यातील मूलभूत आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी वापरण्यात यावा. राष्ट्रीय आरोग्य पायाभूत सुविधा अभियानातून प्रत्येक जिल्ह्याला निधी दिला जात आहे. या निधीतून वैद्यकीय सुविधा बळकट कराव्यात.
हे सुद्धा वाचा : INCOME TAX विभागात नवीन पदांची भरती सुरु, पात्रता आहे दहावी पास | आत्ताच करा अर्ज...
हे सुध्दा वाचा